
मुंबई : मुंबईच्या तापमानात कमालीची घट होऊन २४ तासांत कुलाबा येथे १७.४ तर सांताक्रुझमध्ये १२.५ अंशांची नोंद झाली. १५ जानेवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनते लक्षणीय घट तर कोकण-गोव्याच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्येनोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) १७.४, सांताक्रुझ १२.५, अलिबाग १५.४, रत्नागिरी १६.३, पण्जी (गोवा) १९.०, डहाणू १४.१, भिरा १३.५, पुणे ७.७, अहमदनगर ७.१, जळगाव ८.०, कोल्हापूर १४.५, महाबळेश्वर १२.०, मालेगाव ७.४, नाशिक ५.८, सांगली ११.५, सातारा १०.०, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, औरंगाबाद ७.६, परभणी ९.५, नांदेड १२.०, बीड १४.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, बुलढाणा ९.८, ब्रह्मपुरी १३.२, िंद्रपूर १३.२, गोंदिया १०.८, नागपूर १२.८, वाशिम १२.६, वर्धा११.०, यवतमाळ ९.४.
राज्यात सवाांत कमी ककमान तापमान नाशिक येथे ५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.















