रत्नागिरी, 10 Sept : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे तारांगण प्रकल्प संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सूर्यवंशी, रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, तहसीलदार रत्नागिरी शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी तारांगण प्रकल्प संदर्भात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तारांगणा चे काम मार्च पुर्वी पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तत्पूर्वी उदय सामंत यांनी रत्नागिरी शहर नळपाणी योजना तसेच मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा व अन्य 34 गावांच्या प्रादेशिक योजनांचा आढावाही घेतला .